शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:57 IST

कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले. यानुसार कारखान्यांना फेबु्रवारीमध्ये त्यांच्याकडील कमाल १७ टक्के, तर मार्चमध्ये कमाल १४ टक्केच साखर विकता येणार आहे. यामुळे साखरेची बाजारातील आवक कमी होऊन तिचे दर वाढण्यास मदत होईल, अशी सरकार आणि साखर कारखानदारांचीही अपेक्षा आहे.

साखरेचे घाऊक बाजारातील दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. उसाची एफआरपी देणेही कारखानदारांना अडचणीचे झाले आहे. साखरेचे दर वाढावेत यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी कारखानदारांची आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने साखरेवरील आयात कर दुप्पट केला आहे. राज्य सरकारचाही साखर कारखान्यांकडील २५ टक्के साखर विकत घेण्याचा विचार आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत साखरेचे दर ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. कारखान्यांवर विक्री मर्यादा घातल्यामुळे हे दर प्रतिक्विंटल तीन हजारांच्या पुढेच राहतील, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.अशी ठरेल साठामर्यादासरकारच्या निर्णयानुसार १ जानेवारीला कारखान्याकडे असलेली शिल्लक साखर अधिक जानेवारी महिन्यात झालेले उत्पादन यातून जानेवारीत झालेली विक्री वजा जाता शिल्लक राहिलेल्या साखरेपैकी जास्तीत जास्त १७ टक्के साखर फेबु्रवारीत विकता येणार आहे. अशाच पद्धतीने मार्चमध्ये जास्तीत जास्त १४ टक्के साखर कारखान्यांना विकता येणार आहे. याचाच अर्थ फेबु्रवारीत ८३ टक्के आणि मार्चमध्ये ८६ टक्के साखर कारखान्यांना स्वत:कडे ठेवावी लागेल. 

साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे बाजारातील साखरेचा ओघ कमी होऊन, दर वाढीस मदत होऊ शकेल आणि कारखान्यांना त्याचा फायदा होईल.-विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ.

गेल्या आठ ते दहा दिवसांत साखरेचे प्रति क्विंटल दर १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे ते आणखी वाढतील आणि ते साखर कारखानदारीसाठी फायदेशीर ठरेल.-प्रफुल्ल विठ्ठलानी, अध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने